ठाणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,82,480 हेक्टर असुन मुंबईच्या जवळचा औद्योगिकदृष्टया पुढारलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहरीकरण झालेला जिल्हा असला तरी सर्व पिके मिळून एकूण लागवडी खालील क्षेत्र हे 77,644 हेक्टर एवढे आहे.
जिल्हयात एकूण 1,32,800 शेतकरी खातेदार आहेत. जिल्हयातील संपूर्ण शेतकरी खातेदारांची क्षेत्रधारणा पाहिली तर एकूण खातेदारांच्या 82 टक्के खातेदार (1,08,812) हे अल्प व अत्यल्प भुधारक (2 हेक्टरच्या आत )आहेत. म्हणजेच ठाणे जिल्हयात छोटे क्षेत्र असणा-या शेतक-यांची संख्या जास्त आहे.
ठाणे जिल्हयात सरासरी 2422.50 मि.मि.पाऊस पडतो.जुन,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबर या पावसाळी हंगामात सर्वसाधारणपणे अनुक्रमे 445.5 मि.मि., 1003.6 मि.मि., 640.3 मि.मि., 3232 मि.मि.95.2 मि.मि. एवढा पाऊस पडतो. या हंगामात सर्वसाधारणपणे 70 दिवस एकूण पाउुस पडतो.
ठाणे जिल्हयात प्रामुख्याने चढ उताराची छोटया - छोटया खाचरांची जमिन आढळून येते. पुर्वेला सहयाद्री पर्वतांच्या रांगा तर पश्चिमेला समुद्र किनारा असल्याने समुद्र व खाडयांच्या किनारी क्षारयुक्त खारजमिन आढळून येते. तर पुर्व व मध्य भागात तपकिरी मध्यम काळी आम्लधर्मीय जमिन आढळून येते. या जमिनीची पाणीधारण क्षमता कमी असते. जमिनीच्या या वैशिष्टयामुळेच पावसाळयात जेवढया वेगाने पाऊस पडतो, तेवढयाच वेगाने पडलेल्या पावसाचे पाणी नदया नाल्यांमार्फत समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याचे दुर्भिक्ष्य भासते. जमिन व पावसाच्या या वैशिष्टयामुळेच ठाणे जिल्हयात एकच खरीप हंगाम घेतला जातो त्यामध्ये भात पिकाशिवाय अन्य पर्याय रहात नाही.
खरीप हंगामात जिल्हयाचे भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 60,717 हेक्टर असुन, त्याखालोखाल 3,677 हेक्टर क्षेत्रावर नागली हे पीक घेतले जाते. म्हणजेच खरीपातील एकूण पेरणीच्या 89 टक्के क्षेत्रावर भात पिक घेतले जाते.
भात पिकाची सरासरी उत्पादकता 2508 किलो/हेक्टर एवढी आहे. म्हणजेच जिल्हयात भात पिकाचे एकूण उत्पादन एवढे 152278 मे.टन होत असुन रुपये 1410 प्रति क्विंटल दरानुसार त्याची एकूण किंमत रक्कम रु. 214.71 कोटी एवढी होते.
भात शेतीमध्ये सर्वात जास्त खर्च हा मजुरांवर होतो. भात लागवडीसाठी जमिन तयार करणे,चिखलणी, लावणी,काढणी,मळणी या प्रत्येक कामासाठी मोठया प्रमाणावर मजूर लागतात ते खालील प्रमाणे.
अ.क्र. | कामाचे नाव | प्रतिदिन प्रति हेक्टर मजूर व मजूरी | संपुर्ण ठाणे जिल्हयात (60717 हेक्टर) | |||
---|---|---|---|---|---|---|
मजूर संख्या | दर प्रति मजूर (र.रु) | एकूण खर्च (र.रु) | मजूर संख्या | एकूण खर्च (कोटीत) | ||
1 | चिखलणी | 05 | 350 | 1750 | 303585 | 10.62 |
2 | भात लावणी | 35 | 350 | 12250 | 2125095 | 74.37 |
3 | भात कापणी | 30 | 350 | 10500 | 1821510 | 63.75 |
4 | भात मळणी | 17 | 350 | 5950 | 1032189 | 35.80 |
एकूण | 87 | 30450 | 5282379 | 184.54 |
एक हेक्टर भात लागवडीसाठी पूर्ण कालावधीत एकूण 87 मजूर लागतात. र.रु. 350/- प्रति मजूर प्रतिदिन एवढी मजूरी दिली जाते, म्हणजेच एका हेक्टरसाठी फक्त मजूरीवर रक्कम रुपये 30,450/- एवढा मोठा खर्च होतो. म्हणजेच एकूण उत्पादन खर्चाच्या 90 टक्के खर्च हा फक्त या घटकावर होतो.
संपूर्ण जिल्हयाचा विचार केल्यास 60,717 हेक्टर भात शेतीसाठी र.रु.52.82 लाख मजूर लागत असुन त्याची एकत्रित मजूरी र.रु.184.52 कोटी एवढे होते. अर्थात बहुतांश शेतकरी स्वत:च्या घरातील माणसे मजूरीच्या कामासाठी वापरतात.
भात शेती फायदयात आणावयाची झाल्यास मजूरीवरील खर्च कमी होणे आवश्यक आहे.भातशेतीसाठी जमिन तयार करणे,चिखलणी,लावणी,काढणी व मळणी या कामांना कालमर्यादा असते. ही कामे त्या-त्या वेळेत होणे आवश्यक असते. गावांमध्ये ही सर्व कामे एकाच वेळी सुरु होतात त्यामुळे मजूरांची मागणी एकाचवेळी वाढते. काम जास्त व मजूर कमी या व्यस्त प्रमाणामुळे ही कामे पूर्ण व्हायला उशीर होतो. ही कामे ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा झाल्यास त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम पडतो व उत्पादनात घट होते. त्यासाठी मजूरांची कामे शेतीच्या अत्याधुनिक अशा यंत्राने केल्यास खालील प्रमाणे फायदे होतात.
या सर्व बाबींचा अभ्यासाअंती ठाणे जिल्हा परिषदेने सेस निधी योजनेतून “औजारे बँक” ही नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16 या आर्थिक वर्षात हाती घेतलेली आहे.
जिल्हयात महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान, व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या महिला बचत गटांची संख्या मोठी आहे.
तालुका | लोक संचलित साधन केंद्र(CMRC) | ग्राम संघ (VO) | महिला बचत गट | समाविष्ट कुटुंब संख्या |
---|---|---|---|---|
शहापूर | 2 | 83 | 1631 | 24465 |
भिवंडी | 2 | 83 | 1775 | 26625 |
मुरबाड | 1 | 38 | 243 | 3645 |
कल्याण | _ | 4 | 31 | 265 |
अंबरनाथ | _ | 2 | 19 | 285 |
एकूण | 5 | 210 | 3699 | 55485 |
जिल्हयामध्ये एकूण 3699 एवढे बचतगट,210 ग्रामसंघ व 5 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) असुन त्यामध्ये एकूण 55485 कुटुंब समाविष्ट आहेत. ग्रामीण भागात या बचतगटांचे शिस्तबध्द जाळे सर्वदुर पसरलेले आहे. शेतीमध्ये बहुतांश महिला काम करतात. चिखलणी,लावणी,कापणी,मळणी,फवारणी,खुरपणी इत्यादी कामे महिला करतात. प्रत्यक्ष शेतावर काम करणा-या महिलांचे शारीरिक श्रम कमी व्हावे, मजुरांच्या वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्च कमी व्हावा तसेच शेतीची कामे वेळेत व वेगाने होणेच्या हेतूने नोंदणीकृत महिला बचत गटांच्या ग्राम संघांनाऔजारे बँक (Tool Bank ) या घटकाअंतर्गत औजारांचा संच अनुदानावर उपलब्ध करुन देण्यांत येत आहे. ही औजारे बचतगटांच्या ग्राम संघा कडून भाडेतत्वावर पुरविली जातील. बचतगटाअंतर्गत सदस्यांना नाममात्र दराने तर अन्य शेतक-यांना ठरवलेल्या दराने उपलब्ध करुन दिली जातील. त्याचप्रमाणे शेतक-यांच्या मागणीनुसार काही शुल्क आकारुन शेतीची कामे उदा.चिखलणी,लावणी,फवारणी, काढणी,मळणी इत्यादी कामे करुन दिली जातील. यातुन या महिला बचत गटांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होणार आहे. यांत्रिकीकरणामुळे मजुरांच्या समस्येवर मात करणे शक्य होईल, वाढत्या मजूरीच्या दरामुळे उत्पादन खर्चात होणारी वाढ आटोक्यात येईल.शेतीची कामे वेगात व वेळेत पूर्ण झाल्याने कामाची गुणवत्ता चांगली राहील. औजारे बँकेमध्ये मिनी ट्रॅक्टर,पॉवर टिलर,भात रोवणी यंत्र,भात मळणी यंत्र,भात कापणी यंत्र,गवत कापणी यंत्र,कोनो विडर,पंपसंच,स्प्रेपंप,दातेरी विळे,प्लॅस्टिक क्रेट्स,तसेच कृषि विभागाने त्यांच्या विविध योजनांमध्ये नमुद केलेल्या अन्य औजारांचा समावेश आहे.
सदरची योजना प्रामुख्याने महिला बचत गट, महिला बचतगटांचे ग्रामसंघ, लोकसंचलित साधन केंद्र(CMRC) यांच्यासाठी असल्याने तालुका पातळीवरुन या योजनेची प्रसिध्दी करणेत यावी. पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान,महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी सर्व बचतगटांपर्यंत या योजनेच्या प्रचार होण्याची दक्षता घ्यावी.
किंवा
औजारे बँक ( Tool Bank ) स्थापन करणे.
खालील औजार किंवा कृषि विभागाने विविध योजनांमध्ये नमुद केलेली औजारे,बचत गटांनी त्यांच्या पसंतीनुसार निवड करावयाची आहेत.
अ.क्र. | औजाराचे नाव |
---|---|
1 | पॉवर टिलर / मिनी ट्रॅक्टर |
2 | भात रोवणी यंत्र (Paddy Transplanter) |
3 | भात मळणी यंत्र (मनुष्यचलित /यंत्राने) |
4 | भात कापणी यंत्र ( Power Repear ) |
5 | गवत कापणी यंत्र (Brush Cutter) |
6 | कोनो विडर Cono Weeder |
7 | डिझेल पंपसंच |
8 | पेट्रोल स्टार्ट डिझेल रन पंपसंच |
9 | पिक संरक्षण औजारे |
10 | दातेरी विळे |
11 | ग्रेडींग ॲन्ड पॅकिंग मटेरियल |
12 | कृषि विभागाने विविध योजनांमध्ये नमुद केलेली इतर औजारे |
सदरची योजना प्रामुख्याने महिला बचत गट, महिला बचतगटांचे ग्रामसंघ, लोकसंचलित साधन केंद्र(CMRC) यांच्यासाठी असल्याने तालुका पातळीवरुन या योजनेची प्रसिध्दी करणेत यावी. पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान,महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी सर्व बचतगटांपर्यंत या योजनेच्या प्रचार होण्याची दक्षता घ्यावी.
किंवा
भात शेतीची कामे अनुक्रमे चिखलणी,लावणी,कापणी व मळणी या क्रमाने होतात. यामध्ये जास्त मजुर प्रामुख्याने लावणी व कापणीसाठी लागतात. खरीप- 2015 मध्ये महिला बचतगटांनी भात शेतीची कामे यंत्राद्वारे केलेली होती. त्यांची निरिक्षणे नोंदवली गेली होती ती खालील प्रमाणे:
कामाचे नाव | पारंपारिक ( मजूरी र.रु. 350/- प्रतिदिन ) | यंत्राने | बचत गटाचे दर ( र.रु.) | बचत गटाचा नफा | शेतकरी बचत ( र.रु.) | |||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मजुर (संख्या) | एकूण मजुरी (र.रु.) | मजुर (संख्या) | मजुरी (र.रु.) | इंधन (र.रु.) | एकूण (र.रु.) | वेळ (तास) | ||||
चिखलणी | 3 | 1050 | 2 | 200 | 200 | 400 | 2 | 600 | 200 | 450 |
लावणी | 14 | 4900 | 4 | 400 | 200 | 600 | 1 | 2500 | 1900 | 2400 |
कापणी | 12 | 4200 | 2 | 200 | 100 | 300 | 1 | 1500 | 1200 | 2700 |
मळणी | 7 | 2450 | 2 | 200 | 100 | 300 | 2 | 1000 | 700 | 1450 |
एकूण | 36 | 12600 | 10 | 1000 | 600 | 1600 | 6 | 5600 | 4000 | 7000 |
वरील निरिक्षणांच्या विश्लेषणानुसार, पारंपारीक पध्दतीने केलेल्या भातशेतीसाठी प्रति एकर 36 मजूर लागले होते. त्यामध्ये लावणीसाठी सर्वात जास्त म्हणजेच 14 तर कापणीसाठी 12 मजूर लागले होते. मजूरांना प्रतिदिन र. रुपये 350/- एवढी मजूरी दयावी लागली शिवाय या मजूरांना दुपारचे जेवणही दयावे लागते. भात शेतीच्या संपूर्ण कालावधीत एका एकरसाठी 36 मजूर लागले. त्यासाठी र.रुपये 12600/- एवढा खर्च एकटया मजुर या घटकावर करावा लागला.
पारंपारिक लागवडीच्या तुलनेत यंत्राद्वारे भात लागवडीसाठी संपूर्ण कालावधीत प्रति एकर 10 एवढे मजूर लागले त्यांचा खर्च र.रुपये 1000/- एवढा आलेला होता. यंत्राच्या इंधनासाठी र.रुपये 600/- खर्च आला. म्हणजेच मजूरी व इंधन मिळून र.रुपये 1600/- प्रति एकर एवढा खर्च आलेला होता. या संपूर्ण कामांसाठी फक्त 6 तास एवढा अल्प कालावधी लागला.
महिला बचत गटांनी चिखलणी,लावणी,कापणी व मळणी यासाठी अनुक्रमे र. रुपये 600/-, 2500/-, 1500/- व 1000/- प्रति एकर एवढे दर निर्धारित केलेले होते. त्यातून बचत गटांना चारही कामांसाठी मजूरी व इंधनाचा खर्च वजा जाता निव्वळ नफा र. रुपये 4000/- प्रति एकर एवढा मिळाला, तर शेतक-याची प्रति एकर खर्चात रुपये 7000 इतकी बचत झाली.
पारंपारिक भात लागवडीसाठी मजूर हाताने लागवड करत असल्याने एकाच ठिकाणी 5 ते 6 रोपे लागवड करित असल्याचे निदर्शनास आले. तसेच दोन रोपांमधील अंतर एक समान नव्हते त्यामुळे रोपांची गर्दी होऊन एकंदरीत रोपांच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून आला. तुलनेत यंत्राद्वारे केलेल्या लागवडीमध्ये एका ठिकाणी एकच रोप लावणी झाले शिवाय दोन रोपांमधील अंतर ही समसमान असल्याने रोपांची वाढ जोमात झाल्याचे आढळून आले.
अ.क्र. | बाब | पारंपारिक | यंत्राद्वारे |
---|---|---|---|
1 | एका चुडामधील फुटव्याची संख्या | 16 ते 18 | 22 ते 24 |
2 | रोप संख्या (Plant Population) | 1,50,400 | 1,33,320 |
3 | उत्पादन (क्विंटल /एकर) | 12 | 16 |