l.अंमलबजावणीचे धोरण...
-
गावस्तरावर स्वच्छता उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविणे.
-
हागणदारीमुक्तीसाठी लोकचळवळ बळकट करणे.
-
हागणदारीमुक्त घोषित केलेल्या जिल्हयामध्ये निरंतर स्वच्छतेसाठी आंतरव्यक्ति संवादासह नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे.
-
ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, MGNREGA, MSRLM व इतर सर्व शासकिय विभागांच्या समन्वयातुन स्वच्छतेसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणे.
-
लोकप्रतिाधिनी, विविध शासकिय विभाग, स्वयंसेवी क्षेत्र, खाजगी उदयोजकांच्या सामाजिक उत्तरदायित्वला सक्रिय करणे, सदर घटकांना स्वच्छता संवाद उपक्रमांशी जोडून सक्रिय सहभाग मिळवणे.
l.अभियनातंर्गत उपक्रम...
-
दिनांक 5 ते 8 ऑगस्ट 2017 दरम्यान अभियानपुर्व जिल्हास्तरावर मेळाव्याचे आयोजन - या मेळाव्यात जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांचा सहभाग निश्चित करावा.जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद/पंचायत समिती अधिकारी, सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक, आदींचा यांचा समावेश या मेळाव्यात करावा. याच मेळाव्यात तंत्रज्ञानाविषयक प्रदर्शनाचे आयोजन करावे.
-
दिनांक 08/08/2017 पुर्वी डीजीटल आयईसी एलईडी व्हॅन (Led Van), कलापथक व साहित्य निर्मिती/निवड अंतिम करणे तसेच या उपक्रमांचा सविस्तर तारीखनिहाय गावस्तरावरील कार्य्क्रम निश्चित करणे.
-
आंतरव्यक्ति संवाद साहित्य - संवादकासाठी कीट व लाभार्थीसाठीचे कीट तयार करणे. यामध्ये घडीपत्रिका, माहितीपुस्तिका, पॉकेट डायरी व आवश्यक इतर साहित्यांचा त्यामध्ये समावेश करावा.
-
दिनांक 9 ते 11 ऑगस्ट 17 या कालावधी दरम्यान तालुकास्तरावर भव्य स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करावे. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. या पाहूण्यांच्या हस्ते हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी/कर्मचारी, संपर्क अधिकारी, साधन व्यक्ति आदींचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करावा.
-
तालुकास्तरावर गाव ते तालुकास्तरावरील पदाधिकारी, अधिकारी या अभियानातील सर्व स्तरावरील अपेक्षित संवादक यांना निमंत्रित करुन या कार्यशाळेत निर्माण केलेल्या संवाद साहित्याबाबत व त्याचा वापराबाबत मार्गदर्शन करणे.
-
या अभियानामध्ये गावस्तरावर गृहभेटीसाठी संवादकांची निवड (50 कुटंुबामागे 1 संवादक टीम व एका टीममध्ये किमान 3 सदस्य) याप्रमाणे करुन गावातील गृहभेट उपक्रम सुरु करण्यापुर्वी स्थानिक संवादकांचे प्रभावी आंतरव्यक्ति संवादाबद्दल उद्बोधन करण्यात यावे.
-
गावस्तरावरच्या वातावरण निर्मितीसाठी अभियानाच्या पहिल्या टप्यामध्येच ग्रामसभा, कलापथकांचे कार्यक्रम, डिजीटल व्हॅनद्वारे फिल्मो शो, जाणीव जागृती करणे
-
शालेय विदयार्थ्यांच्या मदतीने वेळोवेळी स्वच्छता फेरीचे आयोजन करणे
-
दिन विशेष- अभियान कालावधीमध्ये महत्वाचे दिन विशेष येत आहेत. या सर्व दिवसांचा योग्यप्रकारे संदेश प्रसारणासाठी उपयोग व्हावा यासाइी प्रयत्न करावा.
-
स्थानिक विशेष दिन/ कार्यक्रमांचा समावेशही करावा.
-
गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी व पाण्याचा स्त्रोताचा परिसर स्वच्छ करणे
-
शालेय स्वच्छतादुत, पाणी व स्वच्छतेविषयी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदि उपक्रम राबविणे
कुटुंबस्तरावर स्वच्छतेसंबंधी आणि स्वच्छतेच्या सवयीसंबंधी अपेक्षित बदलासाठी दृष्टीकोन विकसीत होईल.