ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा:

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वं शाळांमध्ये ‘हात धुवा’ मोहिम राबविण्यांत आली.

           

राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या सर्व ग्रामपंचायतीपर्यंत  पोहचून शाश्वततेसाठी आग्रह धरणे व त्या अनुषंगाने  स्थानिक सामाजिक व्यवस्था करणे.

  • हात धुवा मोहिम
    • ग्रामपंचायत नांदवळ यशोगाथा:-
    • नांदवळ ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 262 कुटूंबे असुन त्यातील 17 कुटूंबांकडे शौचालय असल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंब हि उघडयावर शौचास जात होती.
    • प्रथम नांदवळ ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लब ऑफ हिल हया सामाजिक संस्थेने भेट देऊन गावातील कुटूंबांची अडचण पाहुन तेथे शौचालय बांधकाम करणेसाठी पुढाकार घेतला.
    • शौचालय बांधकाम करणेसाठी प्राधान्याने युनिसेफ व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ठाणे यांच्या संयुक्त्‍ प्रय त्नाने तांत्रिक मार्गदर्शन व लोकसहभाग मिळविण्यासाठी सहभाग दर्शविला.
    • रोटरी क्लब ऑफहिल यांचे निकषानुसार लाभार्थी हिस्सा 3000/- रु तर रोटरी क्लब ऑफ हिल यांचे 15000/- असे एकूण 18000/- रुपयांत शौचालय बांधकाम करण्यात आले.
    • रोटरि क्लब ऑफ.हिल या संस्थेमुळे एकूण 161 शौचालय बांधकामे पुर्ण करण्यात आली.
    • ग्रामपंचायत कोठारे, तालुका शहापुर यशोगाथा- (एक अदिवासी महिलेने घेतलेला पुढाकार)
    • बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 525 कुटूंबे असुन त्यातील 299 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. आदिवासी डोंगराळ भाग असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची उदासिनता दिसुन आली. मोठया प्रमाणात हि कुटूंब उघडयावर शौचास जात होती.
    • गावात आदिवासी सरपंच श्री मधुकर भसाडे व महिला उपसरपंच श्रीमती सखुबाई भस्मा यांच्या प्रयत्नाने एकूण 75 शौचालय बांधकामे पुर्ण झाली आहेत. आजमितीस उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
    • ग्रामपंचायत खरीवली,तालुका शहापुर यशोगाथा:- (एका उपसरपंचाने शौचालयाकरीता केलेला सहकार्य )
    1. बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 372 कुटूंबे असुन त्यातील 311 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. खरीवली स ही ग्रुप ग्रामपंचायत असुन यात जमिन पाण्याची (दलदलीची) व अडचणीची असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची काम करतांना प्रथम सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा व तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगट तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन उपसरपंच श्री योगेश कष्णा भोईर यांनी पुढाकार घेऊन गावात विट,सिमेंद,रेती, शौचालय भांडी ,सिमेंट पत्रे ,बेसीन व गवंडी उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली व कामास गति मिळाली.
    2. ग्रामपंचायतीमध्ये एकूण आजमितीस 181 कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगति पथावर आहेत.
    • ग्रामपंचायत चरगाव व आंबेशीव,तालुका अंबरनाथ यशोगाथा:-(महिला ग्रामसेवकाचे प्रयत्न पण योजनेकडे गावक-यांची पाठ )
    1. ग्रामपंचायत चरगाव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 611 कुटूंबे असुन त्यातील 390 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती भोईर यांनी आदिवासी सरपंच यांच्या मदतीने स्वत: साहिल्य खरेदीकरुन शौचालय बांधकामास सुरुवात केली यात गावाचा कोणताहि सहभाग नसतांना 310 कुटूंबांकडे शौचालय बांधकाम करण्याचे काम केले.
    2. योजना शासनाची आहे त्यामुळे बांधकामे शासनाने करावी अशी गावक-यांची धारणा आहे , परंतु ग्रामसेवकांचे योजना राबविण्यासाठी प्रयत्न
    3. ग्रामपंचायत आंबेशीव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 321 कुटूंबे असुन त्यातील 244 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. त्यापैकी 150 कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती चव्हाण यांनी प्रयत्न शौचालय बांधकामे पुर्ण केली व पुढील कामे प्रगतिपथावर आहेत.
    • ग्रामपंचायत कळमगाव
    1. कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये  बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 916 कुटूंबे असुन त्यातील 627 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले .उर्वरित कुटंबांकडे शौचालय असुन ते त्याचा वापर करत होती.
    1. प्रथम कळमगाव ग्रामपंचायत मध्ये ग्राम सेवक संजय बाळकृष्ण सावंत व सरपंच राजश्री राजेंद्र घाटाळ व उपरसरपंचसंदेश जनार्दन भांडवे यांनी जिल्हा परिषद ठाणे येथील स्वच्छ भारत मिशन चे सल्लागार यांची भेट घेवुन योजना समजुन घेतली नंतर ग्रामपंचायत मध्ये पाडा वस्तीनिहाय बैठका घेतल्या शौचालयाबाबत जन जाग्रुती केली. ग्रामस्थांची आर्थिकबाबतीतील विवंचना पाहुन ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व स्थानिक पुरवठा दाराकडुन शौचालय करीता लागनारा साहित्य खरेदी उधारी स्वरुपात मागविण्यात आले. यातुन 205 शौचालय बांधकाम पुर्ण करण्यात आली. मोठ्या स्वरुपात बांधकामे पुर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदे कडुन मिळणारा प्रोत्साहन निधी कुटुंबानी एकत्रित स्वरुपात जमुन तोपुरवठा दारास देण्यात आला. आता विश्वासामुळे मोठ्या संख्येने कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये कामे चालु आहे.
    1. हे काम करित असताना तेथे गवंड्याच्या प्रशिक्षित चार जोड्या यांचा मोठा सहकार्य लाभला पुर्ण शौचालय बांधकाम होई पर्यंत गवंड्यांनी मजुरी मागितली नाही. यात प्राधान्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकुशलतेची सचोटी दिसुन येते.
    • ग्रामपंचायत आवरे यशोगाथा
    1.  आवरे ग्रामपंचायतीमध्ये  बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 689 कुटूंबे असुन त्यातील 472 कुटूंबांकडे शौचालय     नसल्याचे दिसुन आले. 207 कुटुंबे शौचालयाचा वापर करत होती. आवरे ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पाडे वाडे वस्ती असल्याचे दिसुन आले.
    2.  ग्रामपंचायत आवरे मध्ये ग्राम सेवक दिलीप गोपाळ जाधव यांच्या पुढाकाराने प्रथम ग्रामसभेचे नियोजन करुन सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याने ग्रामसभा, पाडासभा व वस्तीसभा घेवुन ग्रामस्थामध्ये शौचालयाबाबत जनजागृति श्री. जाधव ग्रामसेवक यांनी आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहुन ग्रामपंचायत कडुन शौचालय बांधकामाचे साहित्य यात विटा, रेती, सिमेंट, पत्रे, दरवाजे, शौचालयाची भांडे बेसीन, पाईप उधारी घेवुन व प्रशिक्ष्ण दिलेले गवंडी यांच्या मार्फ़त शौचालय बांधकाम सुरवात केली. यात प्रथम प्राधान्य शौचालयाचा खड्डा तयार करण्या-यास देण्यात आला. यामध्ये शौचालयाचा खड्डा असणा-यास साहित्य वाटप करण्यात आले.
    3.  यामधुन ग्रामसेवक जाधव यांनी शौचालयाची बांधकामाची मोजमापे दिली व शौचालय बांधकामास प्रत्यक्ष सुरवात झाली.
    4.  जो प्रथम शौचालयाचे काम करेल त्यास 12,000/- प्रोत्साहन निधी देवुन गौरवण्यात येईल. यातुन आदिवासी भागातील जांभुलपाडा व काटिचापाडा येथे 100% शौचालय बांधकामे पुर्ण झाले. आजमितीस 386 शौचालय बांधकाम पुर्ण असुन त्याचा वापर होत असल्याचे दिसुन येते.
    • अभियानाचे लक्ष...