ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा

  1. आहिल्यादेवी सिंचन विहीरीमुळे शेती समुध्दी

                 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2019-20 मध्ये आवाळे, ग्रामपंचायत-आवाळे ता.शहापूर जि.ठाणे येथील अ.ज. जमातीचा लाभार्थी असुन श्री. राघो धर्मा दरोडा याने अहिल्याबाई सिंचन विहीर या योजनेचा लाभा घेतला आहे. त्यांच्या कुंटूंबात मी, पत्नी, 1 मुलगा व 2 सुना,1 नात मुले असे एकूण 6 सदस्य आहेत. त्यांच्याकडे उपजिविकेचे दुसरे साधन नसल्याने त्यांचे कुटूंब संपुर्ण शेतीवर अवलंबुन असुन सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना शेतीत कोणतेही दुबार पिक घेता येत नव्हते. परंतु सन 2019-20 मध्ये त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रेाजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत विभागाकडून अहिल्यादेवी सिंचन विहीर मंजुर करण्यात आली.

                  सदर विहीरीचे काम पुर्ण केले असून त्यासाठी 2,63,200/- रुपये अनुदान मिळाले आहे. सदर विहीरीच्या माध्यमातुन त्यांना मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर फायदा झालेला आहे. त्यांच्यामते या योजनेमुळे त्यांच्या कुटूंबाचे भाग्य उजळलेले आहे जेणेकरुन रोजगार हमी योजनेने मला जिवन जगण्याचे वेगळे सामर्थ्य निर्माण करुन दिलेले आहे. यापुर्वी फक्त खरीप अंतर्गत भात शेतीचे पिक घेत असल्याने उत्पादन कमी मिळायचे परंतु मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने मी आता उन्हाळी पिकासोबत आंबा लागवड, भाजीपाला व भेंडी लागवड इ. अशी विविध प्रकारची पिके घेत आहे. सदर योजनेमुळे मोठया उत्पादानात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे माझी व माझ्या कुटूंबाची आर्थिक उन्नती व प्रगती होण्यास मदत झालेली आहे. जेणेकरुन या योजनेने माझ्या कुटूंबाला मोठया प्रमाणावर उत्पन्न मिळवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे त्यांना मजुरीसाठी शहरात जाण्याची गरज नाही व संपुर्ण कुटूंब शेतीत राबून मोठया प्रमाणात उत्पन्न घेत आहे.

 

यशोगाथा

  1. सिंचन विहीर

                  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत चवरे म्हसरुंडी येथील लाभार्थी श्री. शिवाजी भाऊ शेलार याने सन  2015-16 मध्ये पंचायत समिती कल्याण या कार्यालयांकडून सिंचन विहीरीचा लाभ देण्यात आलेला होता. सदर लाभार्थी याने सिंचन विहिरीचे काम पुर्ण केलेले आहे. सदर लाभार्थी सिंचन विहिरीचा लाभ मिळण्यापुर्वी स्वत:च्या शेतीमध्ये पावसाळयात भात शेती करत असून इतर हंगामात पाण्याअभावी कोणतेही पिक घेऊ शकत नसे व सोजगारासाठी त्याला इतर ठिकाणी जावे लागत होते.  सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आल्याने त्याला बारमाही पाण्याची सोय झालेली असून भात हंगामानंतर लाभार्थ्याने भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याला त्याच्या शेतात कायमस्वरुपी रोजगार  उपलब्ध झालेला आहे व भाजीपाला विक्रीपासून त्याला प्रतिवर्षी रक्कम रुपये 75,000/- निव्वळ नफा मिळत आहे.

                 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मिळालेल्या सिंचन विहिरीमुळे त्याला कायमस्वरुपी रोजगार व त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे राहणीमानात सुधारणा झाली आहे असे लाथार्थी याने सांगितले आहे.