ठाणे जिल्हा परिषद

           

योजनेचे प्रमुख उददेश :-


ग्रामीण भागातील जनतेसाठी रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांचे दारिद्रय काही प्रमाणात कमी करणे. अकुशल अंग मेहनतीचे काम करु इच्छिनाऱ्या लोकांसाठी एका आर्थिक वर्षात 100 दिवस काम उपलब्ध करुन देण्याची हमी नरेगा कायदा देतो.

अकुशल रोजगाराची पूर्तता, दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरुपी मालमत्ता तयार करणे हे योजनेचे प्रमुख उदिदष्ट आहे. योजनेमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कामांचा समावेश आहे